Wednesday, September 1, 2010





Dakshin Bharat Jain Sabha's
Pragati ani Jinvijay
-------------------------------------------------------------------------------
Est.1902, issu dt.27 august 2010 issu no.29
-------------------------------------------------------------------------------

शांतीसागर वाणी

अज्ञ आणि तद्न्य

माहितीचा अभाव असणाऱ्या व्यक्तीला अज्ञ मानले जाते. जीवाच्या ज्ञानाचा अभाव तर कधीच होत नाही. परंतु जोपर्यंत जीव संसारी अवस्थेत असतो. तोपर्यंत त्याला चाद्म्स्थ  म्हंटले  जाते. मती -श्रुत  ज्ञानामुळे  अनेक
संसारी जीवना  अज्ञ्पणा  असतोच  असतो. काही गोष्टींची माहिती आखाड्याला अधिक  झाली की, त्याला  त्यातिल  तद्न्य म्हंटले जाते. सर्व विषयातील खरे तद्न्य  तर सर्व्द्नच  असतात. परंतु पार्यायमूढ   जीव स्वताला अनेकवेळा सर्वच विषयात तद्न्य समजू लागतो. त्याची अशी समजूत त्याला त्याच्या संसारी परीभ्रमनाला कारणीभूत होत असते. सर्वज्ञांच्या अभावात आपण अज्ञच आहोत. आपला अज्ञपणा आपण स्वीकारला पाहिजे. अहंकार अज्ञपनाला स्वीकारू देत नाही. अनेक गोष्टीत आपण तद्न्य आहोत हि भावना आपल्याला गर्विष्ठ बनवण्यात कारणीभूत ठरते. अज्ञ असूनही आपणाला आपण तद्न्य मानल्यामुळे अनेक गोष्टींचा विपर्यास होवून विवादाचे प्रसंग उत्पन्न होतात. एखादी व्यक्ती एका गोष्टीत तद्न्य असेल तर ती दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीत अज्ञ असतेच. माहितीचा कमी अधिकपणा किंवा माहितीचा खरे खोटेपणा आपल्याला भ्रमित करू शकतो. त्यामुळे आपण नेहमी माहितीवर विश्वास न ठेवता ज्ञानावर विश्वास ठेवावा. आपली जनण्याची प्रक्रिया कशी झाली आहे. माहिती आपल्यापर्यंत कश्याप्रकारे पोहोचली आहे. ती आपल्याला कोणी पोहोचविली आहे यावर माहितीचे खरेखोटेपण अवलंबून असते. आपण अज्ञ असताना स्वताला तद्न्य समजून कोणतीही गोष्ट करू नका. एखाद्या विषयात तद्न्य असाल तर आपण आणखी कोणत्या गोष्टीत अज्ञ आहोत याचा शोध जरूर घ्या. आपले अज्ञपण जाणण्याचे तद्न्यपण जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत आपण भ्रमित अवस्थेत जी गोष्ट कराल त्याला मूर्खपानच मानण्यात येईल. जन्मजात कोणीही तद्न्य असत नाही. खूप प्रयासाने स्वतःला तद्न्य बनवावे लागते.
ब. ब्र. संजयजी गोपलकर
===========================================



संपादकीय 

धर्म सभेची यशस्वी फलश्रुति

दक्षिण  भारत  जैन सभा, दक्षिण भारत जैन उपाध्याय समिती आणि समस्त दिगंबर जैन समाज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १० ऑगस्ट २०१० रोजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी येथे, जैन धर्मीय समन्वय धर्मसभेचे, अतिशय उत्तमरीतीने आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेसाठी दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील  जैन समाजाचे व संस्थांचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या गोच्या जीन्मान्दिराचे ट्रस्टी, पदाधिकारी, श्रावक-श्राविका प्रचंड संखेने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी द. भा. जैन सभेचे अध्यक्ष, माजी खासदार श्री. काल्लाप्पांना आवाडे (दादा) होते.

अशा प्रकारच्या धर्मसभेची आवशकता का वाटली ? याचे तात्कालिक कारण, चातुर्मासानिमित्त इचलकरंजी येथे आलेल्या, दिगंबर जैन मुनीच्या बाबतीत असले तरी गेले अनेक दिवस सांगली, कोल्हापूर, बेलगाम या जिल्हा परिसरात, अगदी पूर्वीपासून एकत्रितपणे प्राचीन जैन परंपरा, श्रद्धेने सांभाळत असणाऱ्या, जैन समाजामध्ये विघटन करण्याचे काम सुरु आहे. वास्तविक ज्या मुनींनी - आचार्यांनी साधू संतानी, आपल्या धर्मोपदेशाने समाज संघटनाच काम करायला पाहिजे, त्यांनीच मुलभूत धार्मिक आचार- विचारामध्ये, अभिषेक- पूजा प्रकारामध्ये, जे बदल घडवून आणले आहेत आणि श्रावक- श्राविकांच्या मनात संभ्रम निर्माण करून, समाज विघ्तानांचे काम सुरु केले आहे; ते त्यांनी ताबडतोब थांबवावे; अशी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करतो. या धर्मसभेमध्येसुद्धा सर्वांचे म्हणणे आणि मागणे हेच होते.

दक्षिण भारतातील सर्व दिगंबर जैन मंदिरात, प्राचीन काळापासून चालत आलेल्या, आर्ष (रुशीप्रनित) परंपरेनुसार भगवंतावर पंचामृत अभिषेक व पुजाष्टक ई. करण्याचा आणि ब्रह्मदेवादी क्षेत्रपाल तथा धर्नेद्र - पद्मावती इ. यक्ष- याक्षिनिंचा मन- सन्मान, पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय, दिगंबर जैन समाज समन्वय धर्मसभेमध्ये, सर्वानुमते घेण्यात आला; यामुळे लोकांच्या मनात तो संभ्रम होता- तो दूर झाला आणि हा संदेश गावोगावी पोहोचला. या धर्मसभेची हि फार मोठी उपलब्धी आहे. 

आचार्य तथा मुनी- महाराजांनी, समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि जैन समाजातील फूट टाळण्यासाठी, एका व्यासपीठावर येऊन नव्या पिढीला आदर्श ठरेल असे विधायक विचार मांडावेत; नाहीतर जेव्हढे त्यागी- तेव्हढ्या विचारांचे पंथ किंवा संप्रदाय निर्माण होतील आणि समाजाचे संघटन होण्याऐवजी, विघतनच होईल अशी भीती वाटते. 

वेगवेगळ्या राजकीय पक्षातील जैन आमदार वगैरे नेते मंडळी, मतभेद विसरून, जैन समाजातील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाज स्वास्थ्यासाठी, जर एकाच व्यासपीठावर येतात आणि विचार- विनिमय करून, जैन समाज, धर्म, परंपरा, धर्मगुरू इ. साम्भंधी, धर्मसभेमध्ये आपले विधायक विचार मांडून ठोस निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे समाजहिताचे मार्गदर्शन करतात; तर आर्ष परंपरा मननारे आणि न मानणारे असे सर्व जैन धर्मगुरू, एकाच विचारमंचावर येवून समाजस्वास्थ्य आणि धर्मरक्षणाचे विधायक स्वरूपाचे विचार का मांडत नाहीत ? अभिषेक- पूजा पद्धतीसबधी ज्या गावात किंवा भागात, पूर्वापार जी परंपरा चालू आहे; त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार यांना कोणी दिला ? विशेषत: ग्रामीण भागातील जैन समाज, धर्माच्या बाबतील अत्यंत श्रद्धाळू असला; तरी खूप अज्ञानी आहे. मुनी-महाराज जे सांगतात, त्यावर हे लोक विश्वास ठेवतात; म्हणून समाजात धार्मिक आचार- विचारांच्या बाबतीत, फूट पाडणाऱ्या धर्म्गुरुनी, समाजातील भोळ्या भाबड्या श्रद्धाळू लोकांचा विश्वासघात 


 करण्याच पाप करू नये; अस आम्हाला वाटत.






तीर्थंकर भगवान हे पूजनीय आहेत, पद्मावती देवी हि वंदनीय आहे आणि आई- वडील व खरे गुरु हे सर्व आदरणीय आहेत; असे आपण सर्वांनी मानले आणि त्या प्रमाणे दैनंदिन जीवनात आचरण केले तर प्रश्नच मिटतो.




२० व्या शतकातील पहिले दिगंबर मुनी आणि प्रथम आचार्य म्हणून प.पू. १०८ श्री शांतीसागर महाराजांना संपूर्ण जैन समाज मानतो. गेल्या ३५० वर्षापासून खंडित झालेली दिगंबर मुनी परंपरा, २० व्या शतकात श्री शातीसागर महाराजांनी सुरु केली. खुद्द दिल्ली शहरातून अचार्यश्री विहार करताना, " तुम्हे नंगे स्थितीमे यहा सडकपर खुले आम घुमना मना है!" असे महाराजांना सांगून दिल्ली पोलिसांनी मज्जाव केला होता. तेंव्हा आचार्यश्रींनी  रस्त्याच्या मधेच पिंछीने थोडी जागा स्वच्छह केली आणि तिथच बैठक मारली आणि ध्यानाला बसले. दिल्लीची सर्व पोलिस व पुढारी मंडळी अचार्यश्रींच्या जवळ आली; महाराजांचं, जैन दिगंबर मुनींच्या आचारधर्मसम्भधीच म्हणन ऐकून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी महाराजांना जैन मंदिरापर्यंत सन्मानन पोहोचवलं ! त्यावेळी महाराजांनी दिगम्बरावस्थेसाठी सत्याग्रह केला नसता; तर आज मुनीजनाना भारतभर विहार करणे कठीण झाले असते.






त्या अचार्यश्रीनीसुद्धा देवी पद्मावतीचा मन-सन्मान राखला आहे. ' यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:' जिथ स्त्रीची पूजा केली जाते, तिथ देव्तासौधा रममाण होतात. स्त्री ही अबला नसून सबला आहे.



' नारी को अबला न समजो नारी नर का खान !
उसीके कोकसे पैदा हुये महावीर भगवान !!
अशी हि भारतीय स्त्री महान आहे. मग महाराजांच्या आहाराच्यावेली, त्यांना पदघवून घेवून आहार देवू शकते, अष्टक करू शकते; मग ती स्त्री भगवंताचा अभिषेक का करू शकत नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेल्गोल येथील, इंद्रागिरी पहाडावर ५८ फूट उंचीची गोम्तेश्वर भ. बहुबलींची, विशाल तथा मनोद्न्य मूर्ती इ.स.९८१ मध्ये "श्री चावुंडराजे करवियले ' त्या मूर्तीची प्रतीष्टपणा व पंचामृताचा पहिला अभिषेक एक हजार वर्षापूर्वी नेमिचान्द्रचार्यानी केला. तेव्हापासून आजपर्यंत भगवंतावर पंचामृत अभिषेकाची परंपरा अखंडपणे चालू आहे. हि धार्मिक परंपरा का मोडायची ? अशी पंचामृत अभिषेक परंपरा न मानणाऱ्या मुनींना कडाडून विरोध करण्यासाठी, मन-वाचन-कायेने तथा तन-मन-धनाने, आपण सर्वांनी खंभीरपने सज्ज राहिले पाहिजे; तरच धर्मसभेमध्ये टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते मंजूर केलेल्या ठरावांची योग्यरीतीने ताबडतोब अंमलबजावणी होऊ शकेल. हीच या धर्मसभेची खरी फलश्रुती आहे.

धर्मसभेचे स्वागताध्यक्ष श्री. सुधाकर मणेरे, कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देवमोरे, कार्यवाह श्री. चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी समर्पक शब्दात सूत्रसंचालन करणारे श्री तीर्थंकर माणगावे, इचाल्कारांजीतील जिन मंदिराचे  सर्व पदाधिकारी या सर्वांनी समन्वय धर्मसभेचे अत्यंत उत्तमरीतीने आयोजन केले होते; यासाठी द. भा. जैन सभेचे चेअरमन प्रा. डी. ये. पाटील व मुख्यमहामंत्री श्री. सागर चौगुले यांचे उत्तम मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याबद्दल आम्ही या सर्वाना मनापासून धन्यवाद देतो.

या धर्मसभेसाठी भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष निर्मलकुमारजी सेठी (दिल्ली) भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थरक्षा समितीचे अध्यक्ष व द. भा. जैन सभेचे माजी अध्यक्ष आर. के. जैन (मुंबई), जैन धर्म व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक व दिग्विजय पत्रिकेचे संपादक हेमान्तजी कला (इंदोर) द.भा. उपाध्याय समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार उपाध्ये, अखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीचे अध्यक्ष विजय जैन (लुहादिया), आमदार वीर्कुमार पाटील, आमदार अभय पाटील, आमदार संजय पाटील (बेलगाम) आमदार प्रकाश आवाडे, सर्वश्री राजेंद्र पाटील- याद्रवकर, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, शाम्नेवाडीचे अन्नासो खोत, द. भा. जैन सभेचे व्हा. चेअरमन रावसाहेब पाटील (बोरगाव) इ. नि परखडपणे आपले विचार मांडून, आर्ष परंपरेचाच पुरस्कार केला !

यशस्वीपणे सुसम्पन्न   झालेल्या धर्मसभेची सांगता करताना, अध्यक्षीय समारोपात श्री. आवाडे दादा म्हणाले, " समाजात विसंवादी सूर व्यक्त होऊ लागल्यावर, दोन वर्षापूर्वी बाहुबली येथे, मुक्त चिंतन शिबीर घेवून काही ठराव केले; पण त्याची योग्यरीतीने अंमलबजावणी झाली असती, तर सध्याची समस्या उद्भवली नसती. अभिषेक, पूजाविधी, प्रथा परंपरा याविरुद्ध बोलण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, ही गोष्ट दक्षिण भारतातीलच नव्हे; तर उत्तर भातातील धर्मप्रेमिनाही मान्य होणारी नाही. असे धर्मसभेत स्पष्ट झाले आहे. या पर्म्प्रेपेक्षा वेगळी पूजाविधी वैयक्तिक स्वरुपात कोणास करावयाची असेल तर ते करू शकतात; पण समाजाच्या मंदिरात नाही. म्हणून यापुढील काळात जिनमंदिरात आर्ष परम्प्रेनुसारच पूजाविधी सुरु राहतील. आजची हि धर्मसभा या परंपरेचा पुरस्कार करण्यासाठीच सज्ज झाली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
धर्मसभेत तालांच्या गजरात सर्वानुमते मंजूर झालेले ठराव ...
१. दक्षिण भारतामध्ये आर्ष परंपरेनुसार पंचामृत अभिषेक व पूजा पद्धती पूर्वापार प्रथेप्रमाणे, पूजेत महिलांचा सहभाग यापुढेही कायमस्वरूपी चालू राहील.
२. क्षेत्रपाल आणि यक्ष-याक्षिनिंचा, पूर्वीप्रमाणे चालणारा मानसन्मान यापुढेही कायमपणे होत राहील.
३. द. भा. जैन सभा व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ, वादग्रस्त मुनीच्या गुरूकडे जावून, त्यांची सविस्तर माहिती देतील.
४. दिगंबर जैन मंदिरांच्या नावामध्ये वीसपंथी आम्नाय असा उल्लेख करून अशा विचारांच्याच व्यक्तींचा मंदिर कमिटीमध्ये समावेश राहील.
---------------------------------------------------------------------------------------------------------- 


                                                                                                                      प्राचार्य श्रीधर हेरवाडे

No comments:

Post a Comment